अकोले तालुका
अहमदनगर जिल्हा

Tuesday 26 June 2012

रतनगड किल्ला / Ratangad Fort

रतनगड

रतनगड हा अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील  एक किल्ला आहे.
गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.
१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.


रतनगड किल्ला

गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे -

१ - गणेश दरवाजा.

२ - रत्ना देवीची गुहा. (मंदिर)

३ - मुक्कामाची गुहा.

४ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)

५ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)

६ - कडेलोट पॉइंट.

७ - राणीचा हुडा (भग्न बुरूज)

८ - प्रवरेचे उगमस्थान.

९ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.

१० - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )

११ - नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)

११ - कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)


गडावर रहाण्याच्या सोईसाठी दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावरील गुहांमध्ये अंदाजे ३० ते ३५ लोक राहू शकतात.

गडावर खान्याची सोय नाही. स्वताला ती व्यवस्था करावी लागते.

गडावरील पाण्याची टाके आहेत. त्यातील काही पिण्यायोग्य आहेत. कल्याण दरवाज्याजवळील झरा सुमधुर आहे.
गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. १ रतनवाडीहुन २ कुमशेतहुन शिवकालीन मार्गाने ३ साम्रदहुन
मुंबईहून इगतपुरी-घोटी मार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनवाडीला पोहचता येते.
रतनवाडीला पोहचण्यासाठी अकोले-रतनवाडी बस सुविधा आहे. परंतु ती सोयीची नाही.
रतनवाडीतून गडावर पोहचण्याकरिता ३ तास लागतात.

0 comments:

Post a Comment

 

Sample text

Sample Text

Sample Text